पीक कर्ज न फेडल्यामुळे बँकेने शेतकऱ्याची जमीन घेतली ताब्यात

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्याचे नुकसान आणि बाजारामध्ये शेतमालाला कमी मिळालेला भाव यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज परत फेडणे हे शक्य झाले नाही अशा एका शेतकऱ्याला बँकेने शेतकऱ्याची जमीन ताब्यात घेतलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे

यवतमाळ जिल्ह्यातील घडलेला हा प्रकार आहे बँकेच्या पठाणी वसुली धोरणाविरोधात असंतोष व्यक्त केला आहे आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे 9 लाख हेक्टर क्षेत्रातून जवळपास पाच लाख हेक्टर हे कापूस उत्पादक आहे या ठिकाणी कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे या उत्पन्नाद्वारे शेतकऱ्याला सर्व गरजा भागवून पीक कर्ज परतफेड करणे शेतकऱ्यासमोर आव्हान आहे उत्पन्न कमी होत असल्यामुळे आणि भाव नसल्यामुळे शेतकऱ्याचे आत्महत्येचे प्रकार घडतात

बँकेने शेतकऱ्याकडून वसुली करण्याचा प्रकार समोर आलेला आहे बँकेच्या पठाणी वसुलीचा प्रकार आहे महागाव तालुक्यातील पेडगाव चे शेतकरी सेवा पवार यांच्याकडे जवळपास 27 एकर जमीन आहे आणि त्यांनी 2. 92 हेक्टर जमिनीवर 2012 जिल्हा बँकेकडून तीन लाख 56 हजार 691 रुपये एवढे कर्ज घेतले होते त्यांना या कर्जाचा भरणा शक्य झालेला नाही

जवळपास मुद्दल आणि व्याज धरून ही रक्कम 6 लाख 70 हजार एवढी झालेली आहे कर्ज रक्कम जास्त झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनातून देखील शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही परिणामी थकबाकी असल्यामुळे बँकेकडून या शेतकऱ्याच्या हेक्टर 2.92 शेत जमिनीवर ताबा घेण्यात आला यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे

कोणीही मालमत्ता संदर्भात व्यवहार करू नये केल्यामुळे मालमत्ता वर कारवाई केली जाऊ शकते अशा प्रकारचा इशारा जिल्हा बँक प्रशासनाकडून जाहिरात प्रकाशित करून देण्यात आलेला आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी ची वाढ झाली आहे

Leave a Comment